पृष्ठे

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

म्हैस


एक म्हैस - 
खुप छान दिसते, 
आखीव रेखीव शिंगे, 
मारत नाही, 
लहान मुलं शिंगावर  बसून बिनधास्त खेळू शकतात. , 
उठ म्हटले की उठते,
बस म्हटले की बसते. 
कमी खाते, 

( फक्तं दूध देत नाही.)

बुधवार, १४ जून, २०२३

समान नागरी कायदा

समान नागरी कायदा बाबत खूप मोठ्या प्रमाणात समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूला गैरसमज आहेत. घटनेत राज्यव्यवस्थेला दिलेली मार्गदर्शक तत्व आहे. यातील कलम ४४ समान नागरी संहिता चे आहे. एकसमान नागरी संहिता सर्व धार्मिक समुदायांना लागू होण्यासाठी एक देश, एक नियम असा प्रतिध्वनित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये ‘समान नागरी संहिता’ हा शब्द स्पष्टपणे नमूद केलेला आहे. कलम ४४ म्हणते, "राज्य भारताच्या संपूर्ण भूभागात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल."▶️समान नागरी संहितामुळे आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. ▶️ सर्व फौजदारी कायद्यांत पूर्वीपासूनच सर्व धर्मियांना समान नियम आहेत. ➡️  हा असा कायदा आहे जो संपूर्ण देशासाठी एक कायदा प्रदान करेल, जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये लागू होईल जसे की,१. विवाह,२. घटस्फोट, ३. वारसा,४. दत्तक घेणे  ( सध्या या बाबी धार्मिक आधारावर भिन्न कायद्याने होत आहेत. ) समान नागरी कायद्याने त्या धार्मिक आधारावर करता येणार नाहीत. अनेक जनजातींचे समुदायात रूढी, परंपरा (विवाह, घटस्फोट, वारस, दत्तक याबाबत) देखील वेगळ्या प्रकारे आहेत. त्यांचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. . . समान नागरी कायदा झाला पाहिजे. त्याचे डोळसपणे समर्थनीय आणि विरोधातील मुद्द्यांचे synthesis होऊनच! शुभं भवतू🙏🏻रोहीत पाठक.

रविवार, ११ जून, २०२३

तात्पुरता उपाय

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.
 

शनिवार, ११ मार्च, २०२३

बरे वाईट व्यक्तीचा गुण

प्रत्येकाच्यात कमी अधिक प्रमाणात बरे वाईट गुण असतात. 
एकुणात हिशोब केल्यावर जास्त वाईटपणा सहज लक्षात येतो, तेच त्याचे व्यक्तिमत्त्व समजले जावे. 
ओढून ताणून चांगले गुण शोधणे म्हणजे झिरो ला हिरो बनवणे असते.

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

common sense

खरं,  खरे , आदर्श वगैरे काल्पनिक असते.! 
असे आदर्श पूर्वीही नव्हते, आताही नाहीत, भविष्यात देखील असण्याची शक्यता कमीच आहे. 

म्हणूनच त्यातल्या त्यात बरं निवडावे लागते, 
जनता सुज्ञ असते. कायदेपंडित नसते. 
कारण कायदा हा codified common sense असतो. 
जनतेचा common sense योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतो.

शनिवार, २१ जानेवारी, २०२३