पृष्ठे

गुरुवार, २२ मे, २०२५

legal logical and moral

कोणतेही काम legal, logical आणि moral कसोटीवर पडताळून पाहिले पाहिजे. 
त्या तीनपैकी दोन बाजूकडे कल असणारी भूमिका घ्यावी. 

सामान्यतः तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर अशा बाबतीत काम केले जाते असे माझे व्यक्तिशः निरीक्षण आहे. 

वरिष्ठ स्तरावर जाताना कायदा नियमांकडे जास्त कल असतो, तो असणे बरोबरच आहे. 

शासकीय काम खालून वर जाताना अधिक गांभीर्याने तपासले जाणे योग्य आहे. तिथे भावनिक भूमिका अडचणीची ठरू शकते. 

गाव स्तरावर legal, logical आणि moral काम करण्याची जास्त संधी असते आणि with Bonafide intention अशी संधी घेतलीही पाहिजे. 

अशा सहकार्याच्या भूमिकेतून केलेल्या कामांचे पॉइंट्स जमा होतात.  आपल्या अडचणीच्या प्रसंगी ते कामी येतात. 


तात्यांचे परिपत्रक

रविवार, २८ जुलै, २०२४

गुरु शिष्य आज्ञाधारक

एक गुरु आणि त्याचे आठ- दहा शिष्य असे अध्ययन करत गावोगावी फिरत असतात.  गुरु आणि शिष्य यांच्यात प्रबोधनाचे संवाद होत असतात.  गुरु शिष्याला सांगतो की परस्त्रीला स्पर्श करू नये, तिच्याशी वाईट बोलू नये, शिवी देऊ नये वगैरे 
आणि असंच आठ-दहा जण शिष्य पुढे पुढे जात जात असताना वाटेत एक नदी येते आणि ती नदी होडीतून पार करायची असते. 
होडीतून पलीकडे जाताना एक महिला त्या होडीत बसण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला होडीत बसायला जमत नसल्यामुळे एक शिष्य हात देतो आणि त्याच्या हाताला धरून ती महिला होडीत बसते. होडी नदीच्या पार जाते. 
 हे गुरु शिष्य पुढच्या प्रवासाला निघतात.  जाताना वाटेत एक शिष्य गुरूंच्या जवळ जाऊन कानात कुजबुजू लागतो -
 गुरुदेव आपण सर्वांना सांगितले आहेत की परस्त्रीला स्पर्श करू नये.  परंतु आपल्या ' या ' शिष्याने होडीत स्त्रीच्या हातात हात दिला.  त्याने नियम मोडला. त्याला प्रायश्चित घ्यावे लागेल अन्यथा पाप लागेल. 

गुरुदेव उत्तरले - अरे मुर्खा! त्याने धरलेला हात होडीतच सोडून दिला,  पण तू तुझ्या मेंदूत तो हात घेऊन इथपर्यंत आला आहेस.! 

शुक्रवार, २८ जून, २०२४

अफसाना खुबसुरत मोड पे छोडणा अच्छा

वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन. उसे इक ख़ूब-सूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा.

ताणतणाव व्यवस्थापन

ताणतणाव व्यवस्थापन - 
( ताणतणाव नष्ट करता येणं अशक्य आहे पण त्याचे व्यवस्थापन सहज शक्य आहे.) 

मा. जिल्हाधिकरी सो यांचे सूचनेप्रमाणे आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी ताणतणाव व्यवस्थापन बाबत खूप छान माहिती दिली. 

Anxiety, depression and suicidal tendancy ही मानसिक समस्या आहे. आणि याकडे समस्या म्हणून पाहण्याची जाणीव या निमित्ताने झाली. 
एखादा प्रश्न समजणे हे त्या प्रश्नाचे अर्धे उत्तर असते.! 

प्रत्येकाच्या आयुष्यात एक दोन वर्षे किंवा एक दोन व्यक्ती खराब भेटत असतात. त्यांना take it easy पद्धतीने हाताळले पाहिजे. . . कारण आपल्याकडे अनेक चांगली वर्षे आणि व्यक्ती असतात. 

आपल्याला डिस्कनेक्ट होता आले पाहिजे. 
प्रसंगानुरूप स्वतःचे व्यक्तीत्व आणि पद वेगळं करता यावे. 

ऑफीस मधून घरी गेल्यावर आणि घरातून ऑफिस मध्ये आल्यावर. जिथे आहे तिथे १००% शरीर - मन - बुध्दीने असणे. 


 व्यक्तित्वाचा प्राधान्यक्रम 
1. Happiness आनंद 
2. मानसिक आरोग्य 
3. शारीरिक आरोग्य 
4. समाजभान
4. नातेसंबंध 
5. आर्थिक क्षमता 
असा असेल तर उत्तम.! 


- सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत की गाणं म्हणत ( मंगेश पाडगांवकर)
- मी हजार चिंतांनी डोके खाजवतो - तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो (संदीप खरे)
ही दोन गाणी ताणतणाव व्यवस्थापन करणारी आहेत. 


आजच्या session ने खूप काही मिळाले आहे. 

सरांचे व civil hospital अधिकारी यांचे खूप खूप आभार! 
🙏🏻
रोहीत पाठक
29.06.2024

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

म्हैस


एक म्हैस - 
खुप छान दिसते, 
आखीव रेखीव शिंगे, 
मारत नाही, 
लहान मुलं शिंगावर  बसून बिनधास्त खेळू शकतात. , 
उठ म्हटले की उठते,
बस म्हटले की बसते. 
कमी खाते, 

( फक्तं दूध देत नाही.)

बुधवार, १४ जून, २०२३

समान नागरी कायदा

समान नागरी कायदा बाबत खूप मोठ्या प्रमाणात समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूला गैरसमज आहेत. घटनेत राज्यव्यवस्थेला दिलेली मार्गदर्शक तत्व आहे. यातील कलम ४४ समान नागरी संहिता चे आहे. एकसमान नागरी संहिता सर्व धार्मिक समुदायांना लागू होण्यासाठी एक देश, एक नियम असा प्रतिध्वनित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये ‘समान नागरी संहिता’ हा शब्द स्पष्टपणे नमूद केलेला आहे. कलम ४४ म्हणते, "राज्य भारताच्या संपूर्ण भूभागात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल."▶️समान नागरी संहितामुळे आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. ▶️ सर्व फौजदारी कायद्यांत पूर्वीपासूनच सर्व धर्मियांना समान नियम आहेत. ➡️  हा असा कायदा आहे जो संपूर्ण देशासाठी एक कायदा प्रदान करेल, जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये लागू होईल जसे की,१. विवाह,२. घटस्फोट, ३. वारसा,४. दत्तक घेणे  ( सध्या या बाबी धार्मिक आधारावर भिन्न कायद्याने होत आहेत. ) समान नागरी कायद्याने त्या धार्मिक आधारावर करता येणार नाहीत. अनेक जनजातींचे समुदायात रूढी, परंपरा (विवाह, घटस्फोट, वारस, दत्तक याबाबत) देखील वेगळ्या प्रकारे आहेत. त्यांचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. . . समान नागरी कायदा झाला पाहिजे. त्याचे डोळसपणे समर्थनीय आणि विरोधातील मुद्द्यांचे synthesis होऊनच! शुभं भवतू🙏🏻रोहीत पाठक.

रविवार, ११ जून, २०२३

तात्पुरता उपाय

अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.