बुधवार, १४ जून, २०२३
समान नागरी कायदा
समान नागरी कायदा बाबत खूप मोठ्या प्रमाणात समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूला गैरसमज आहेत. घटनेत राज्यव्यवस्थेला दिलेली मार्गदर्शक तत्व आहे. यातील कलम ४४ समान नागरी संहिता चे आहे. एकसमान नागरी संहिता सर्व धार्मिक समुदायांना लागू होण्यासाठी एक देश, एक नियम असा प्रतिध्वनित आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये ‘समान नागरी संहिता’ हा शब्द स्पष्टपणे नमूद केलेला आहे. कलम ४४ म्हणते, "राज्य भारताच्या संपूर्ण भूभागात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल."▶️समान नागरी संहितामुळे आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. ▶️ सर्व फौजदारी कायद्यांत पूर्वीपासूनच सर्व धर्मियांना समान नियम आहेत. ➡️ हा असा कायदा आहे जो संपूर्ण देशासाठी एक कायदा प्रदान करेल, जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये लागू होईल जसे की,१. विवाह,२. घटस्फोट, ३. वारसा,४. दत्तक घेणे ( सध्या या बाबी धार्मिक आधारावर भिन्न कायद्याने होत आहेत. ) समान नागरी कायद्याने त्या धार्मिक आधारावर करता येणार नाहीत. अनेक जनजातींचे समुदायात रूढी, परंपरा (विवाह, घटस्फोट, वारस, दत्तक याबाबत) देखील वेगळ्या प्रकारे आहेत. त्यांचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. . . समान नागरी कायदा झाला पाहिजे. त्याचे डोळसपणे समर्थनीय आणि विरोधातील मुद्द्यांचे synthesis होऊनच! शुभं भवतू🙏🏻रोहीत पाठक.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा